Avilability: Out of stock
भारतीय समाजाचे वर्णन नेहमी अनेकतेतून एकता व एक मिश्र संस्कृती म्हणून केले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारतास ‘लोकतांत्रिक’ व ‘धर्मनिरपेक्ष’ अशी संज्ञा दिली आहे. परंतु या संकल्पनेस नजीकच्या काळात उघड तडे दिसू लागले आहेत. परिणामी भारतीय समाजाच्या स्वरूपासंबंधी वादविवाद व चर्चा सुरू झाल्या आहेत. कटुता वाढविणार्या संकटाच्या विविध पैलूंवर लक्ष करून, हे पुस्तक वेगवेगळ्या मुद्द्यांचे पृथक्करण करते. या पुस्तकात लेखक भारतातील लोकतांत्रिक सुव्यवस्थेला, परस्परविरोधी असे जे सात आंतरिक धोके आहेत त्याबद्दल चर्चा करत आहेत. श्र फुटीरवादी चळवळी, ज्या भारत सरकारचा कायदेशीरपणा व एकच ‘भारतीय’ व्यक्तित्व याबद्दल प्रश्न उभे करतात. श्र इरेडेंटिस्ट चळवळी, ज्यामध्ये जमातींचे किंवा भाषिक समाजांचे कृत्रिमपणे वेगळ्या राजकीय भागात तुकडे पाडले जातात, ते ही चळवळ नाकारते. श्र केंद्र सरकारने प्रादेशिक राज्यांना कबूल केलेली अपुरी स्वायत्तता. श्र काही विशिष्ट प्रदेशात राहणारे रहिवासी, धोक्यांना तोंड देत आहेत. कारण प्रमाणाबाहेर असलेले स्थलांतरित त्यांच्यावर अधिकार गाजवत आहेत. श्र हिंदू मूलतत्त्ववाद्यांमुळे निर्माण झालेले धोके व त्यांची ‘राष्ट्रीय संरचना’ अल्पसंख्याक धार्मिक समाजावर आधारित, ज्याचे उदाहरण २००२ च्या गुजरात ‘रक्तपाता’मुळे दिसून येते. श्र पारंंपरिक दबावाखाली जातींना, उच्चवर्णीय श्रेष्ठत्वाचा अधिकार असलेल्या व्यक्तित्वांनी निर्माण केलेला धोका. श्र श्रेष्ठ व कुटुंबप्रमुख श्रेष्ठत्वाचा अधिकार, जे त्यांच्यामधील स्त्रियांना व गरिबांना दुय्यम मानतात. प्राध्यापक ओमन यांच्या मते या धोक्यांवर नियंत्रण ठेवता येईल. हे पुस्तक विद्यार्थ्यांना, मानववंशशास्त्राचे अभ्यासक, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, त्या संबंधित नागरिकांकरिता अतिशय मौल्यवान आहे.